
“आता माझी सटकली!” नाशिकमधील ‘आसाराम बापू पुला’वरून नागरिकांचा संताप; भोंदू बाबांच्या नावाला फासा आणि महापुरुषांचे नाव द्या!
लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.१६:-विशेष प्रतिनिधी, नाशिक प्रभू रामचंद्रांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेली नाशिक नगरी! पण आजकाल याच पुण्यभूमीत भोंदू बाबांचे आणि धर्माच्या नावाखाली धंदा मांडणाऱ्यांचे पेव फुटले आहे. बॉलिवूडचा एक प्रसिद्ध डायलॉग आहे, “ये शहर जितना शांत दिखता है, अंदर से उतना ही सुलग रहा है!” अगदी तशीच अवस्था आज नाशिककरांची























